मुंबई : राज्यभरात १९ फेब्रुवारीला शिवजंयती साजरी केली जाणार असून संपूर्ण राज्य कोरोना संकटानंतर पूर्वपदावर येत असले तरीही राज्य सरकारकडून अद्याप काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून यासंबंधीची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.
-साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा.
-गड-किल्ल्यांवर जाऊन यंदा शिवजयंती साजरी करु नये.
-सांस्कृतिक कार्यक्रमांचे सार्वजनिक ठिकाणी आयोजन करु नये.
-यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांवर बंदी.
-महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे.
-शिवजयंती फक्त १० जणांच्या उपस्थितीत साजरी करावी.
-आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी