वाहनचालकांनो 'ही' तारीख लक्षात ठेवा.. नाहीतर भरावा लागेल मोठा दंड

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा


सांगली – राज्यातील जुन्या वाहनधारकांनी जर आपल्या वाहनावर अद्याप उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवली नसेल, तर त्यांना १६ जून २०२५ पासून वाहनविषयक महत्त्वाचे कामकाज करता येणार नाही.


१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व परिवहन संवर्गातील वाहनांसाठी ही अट लागू करण्यात आली आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त योग्यता प्रमाणपत्र व खाजगी वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण या दोन सेवा वगळता इतर सर्व कामांसाठी HSRP पाटी आवश्यक असेल.

यामध्ये वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रातील पत्ता बदल, वित्त बोजा लावणे/काढणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र आणि वाहनामधील बदल यांसारख्या सेवा समाविष्ट आहेत.

HSRP नसलेल्या वाहनधारकांना १६ जूननंतर या सेवा नाकारण्यात येतील. त्यामुळे वाहनधारकांनी विलंब न करता अधिकृत विक्रेत्यांमार्फत ही पाटी बसवून घेणे आवश्यक आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !