येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
सांगली – राज्यातील जुन्या वाहनधारकांनी जर आपल्या वाहनावर अद्याप उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवली नसेल, तर त्यांना १६ जून २०२५ पासून वाहनविषयक महत्त्वाचे कामकाज करता येणार नाही.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त योग्यता प्रमाणपत्र व खाजगी वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण या दोन सेवा वगळता इतर सर्व कामांसाठी HSRP पाटी आवश्यक असेल.
यामध्ये वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रातील पत्ता बदल, वित्त बोजा लावणे/काढणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र आणि वाहनामधील बदल यांसारख्या सेवा समाविष्ट आहेत.
HSRP नसलेल्या वाहनधारकांना १६ जूननंतर या सेवा नाकारण्यात येतील. त्यामुळे वाहनधारकांनी विलंब न करता अधिकृत विक्रेत्यांमार्फत ही पाटी बसवून घेणे आवश्यक आहे.