राजमाता अहिल्यादेवींच्या प्रेरणेतून चित्रलेखन, ‘विचार भारती’ आणि ‘जनसेवा फाउंडेशन’चा उपक्रम


अहिल्यानगर - ‘विचार भारती’ आणि ‘जनसेवा फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन माऊली सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन धनश्री सुजय विखे यांच्या शुभहस्ते झाले.

या प्रसंगी रवींद्र मुळे, नगरसेवक निखिल वारे, धनंजय जाधव, सुप्रसिद्ध कलाशिक्षक नंदकुमार देशपांडे, विवेक भरताल, अनामिका म्हस्के, हर्षदा डोळसे, राजेंद्र धस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रदर्शनात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनप्रवासाचे चित्रण, इतिहास समजून देणारी व्यक्तिचित्रे, दुर्ग-गड किल्ल्यांची भव्यता आणि भारतीय मंदिरांची रेखाटनात्मक सौंदर्यचित्रे सादर करण्यात आली होती. नागरिकांनी या कलाविष्काराला भरभरून प्रतिसाद दिला.

उत्कृष्ट नियोजन, भव्य आयोजन यासाठी ‘विचार भारती’ व ‘जनसेवा फाउंडेशन’चे मनःपूर्वक आभार व्यक्त करत, या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे व विजेत्यांचे संयोजक अशोक डोळसे यांनी हार्दिक अभिनंदन केले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !