मुंबई : दहा महिन्याच्या दीर्घ सुट्टीनंतर राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरु झाल्यानंतर आता कॉलेज कधी सुरु होणार या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात दोन दिवसात कॉलेज सुरु होण्याची तारीख जाहीर केली जाईल असे सांगितले.
राज्यभरातील कॉलेज लवकरच सुरु करण्याच्या तयारीत उच्च शिक्षण विभागा असल्याचे दिलेय येते आहे. राज्यातली महाविद्यालयं सुरू करण्यासाठी एसओपी ठरवण्यासाठी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक पार पडली. युजीसीच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत मार्गदर्शक तत्त्व ठरवून टप्प्याटप्प्याने कॉलेजेस सुरू करण्यासंदर्भात महत्वाची चर्चा झाली.
वसतिगृहाचे सॅनिटायझेशन
कोरोना काळात कॉलेज विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा उपयोग क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आला होता. आता ही वसतीगृह सॅनिटाईज करण्यात येत आहेत.