नवी दिल्ली - जोईर्यंत कायदा मागे घेत नाही तो पर्यंत घरवापसी नाही असा नारा देतानाच ऑक्टोबरच्या आत हे आंदोलन संपणार नसल्याची मोठी घोषणा भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी केली आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधातराजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे स्वरुप दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार देखील भारतीय किसान युनिअनने व्यक्त केला आहे.
देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन आपण मोहीम राबवणार असल्याचे भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केले आहे. तर दुसरीकडे ६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ची घोषणादेखील शेतकऱ्यांनी केली आहे.
👉 आमचा व्हाट्सअप ग्रुप ज्वाईन करा
👉 तुमचं काम अडवणाऱ्या अधिकाऱ्याला असा विचारा जाब
https://www.mbplive24.com/2021/01/RTI-annahajare-ACT.html