येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - येथील रेसिडेन्शिअल हायस्कूलची इयत्ता दहावीच्या १९९७-९८ मधील बॅचचे स्नेहसंमेलन रविवार (दि.११) रोजी उत्साहात पार पडले. या निमित्ताने तब्बल २७ वर्षानंतर मित्र, मैत्रिणीचे आणि गुरुजनांच्या भेटी झाल्या. प्रत्येकाच्या चेहर्यावर भेटीचा उत्साह दिसून येत होता.
स्नेहसंमेलनाची सुरुवात, गणेश जासूद, राजू बेल्हेकर, श्रीकांत खाडे, सलीम शेख, दिपाली रोहकले, अश्विनी मिसाळ यांनी केली. विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारतीत पुनः भेट देत अनेक आठवणींना उजाळा दिला. या २७ वर्षांच्या कालावधीनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या गमती, आणि शिक्षकांच्या शिकवणींबद्दल चर्चा केली.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ग्रुप तयार करुन सर्व मित्र परिवार जोडला. या स्नेह मेळाव्यात माजी शिक्षकांनीही भाग घेतला. त्यात दहातोंडे सर, काळे सर, शिंदे सर, जाधव सर, गोरे सर, लगड मॅडम, तवले मॅडम, प्राचार्य पोकळे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली. हा कार्यक्रम आमच्यासाठी महत्त्वाचा ठरला, कारण यातून शाळेची आठवण, 27 वर्षानंतर विद्यार्थ्यांचा एकत्र येण्याचा अनोखा अनुभव, आणि एकमेकांशी पुन्हा जोडले जाण्याची संधी मिळाल्याची भावना या वेळी गणेश पुंड, अनिकेत देवढे, गणेश जासूद, गायत्री चौकडे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मांडल्या.
अनेकांनी शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या मार्गदर्शनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर पडलेल्या परिणामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्व मित्र-मैत्रिणीनी पुन्हा लवकर भेटण्याचा संकल्प करत एकमेकांचा निरोप घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलीम शेख, राजू बेल्हेकर, प्रशांत ढोबे, गणेश जासूद, बलराम दोमल, श्रीकांत खाडे, विजय भूतकर, महेश मचे, दिपाली रोहकले यांनी प्रयत्न केले.
या स्नेहमेळाव्यासाठी प्रमोद शिंदे, अनुराग जवळकर, दिपक निमसे, अमित हापसे, गोपाल गोरे, प्रमोद पिसाळ, माधुरी वाघमारे, वृषाली खांदवे, स्मिता लहामगे मनीषा व नीलिमा काजवे, संपदा तवले, अश्विनी गाडे, अर्चना पेचे हे विद्यार्थी छत्रपती संभाजी नगर, पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद व गुजरात येथून आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय प्रभावी आणि सुंदर पद्धतीने वर्षा सुंभे यांनी पार पाडले. प्रास्तविक छाया लहारे यांनी केले. तर सर्वांचे आभार राजू बेल्हेकर यांनी मानले.