अहिल्यानगर - बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेदरम्यान अवैध गोवंश कत्तलीवर कडक कारवाई करत तब्बल ७९ गोवंश जनावरांचे प्राण वाचवण्यात पोलीस दलाला यश आले आहे.
सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जून रोजी संध्याकाळी ६ ते ६ जून रोजी पहाटे २ वाजेपर्यंत ही विशेष कारवाई राबविण्यात आली.
यामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा आणि एकूण ३२ पोलीस अधिकारी व २५० पोलीस कर्मचारी सहभागी होते.
- कारवाईचा तपशील :
- प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल - १३
- मुक्त केलेली गोवंश जनावरे - ७९
- जनावरांची किंमत - ३७ लाख ३ हजार रु.
- गोवंश कत्तल करणाऱ्या आरोपींची तपासणी - ६४
- कत्तलखाने तपासणी - ३२
- इतर सराईत गुन्हेगारांची तपासणी -११३
- चेकपोस्टवर तपासणी - २३
या मोहिमेचे नेतृत्व व समन्वय सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), प्रशांत खैरे (अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), वैभव कलुबर्मे (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर) यांनी केले. या कारवाईने अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंश तस्करी व अवैध कत्तल उद्योगांना चपराक बसली आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काळातही अशा कारवाया सातत्याने राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.