ग्रामीण भागातील पहिली पर्यावरण परिषद यशस्वी, आत्मनिर्भर फाउंडेशनचा पुढाकार


अहिल्यानगर - जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आत्मनिर्भर फाउंडेशन संचालित पर्यावरण संवर्धन समितीच्या पुढाकाराने ग्रामीण भागातील पहिली पर्यावरण परिषद येथील इसळक श्रीक्षेत्र लिंगतीर्थ येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

या परिषदेसाठी उद्घाटक म्हणून जागतिक कीर्तीच्या पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांची उपस्थिती लाभली. तसेच पर्यावरणप्रेमी रमेश खरमाळे, विभागीय वन अधिकारी सचिन कंद, सामाजिक विचारवंत प्रा. डॉ. महेबुब सय्यद, परिषदेचे अध्यक्ष भगवानदास शास्त्री घुगे यांनी या पहिल्या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले.

चर्चासत्रात स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या पर्यावरणप्रेमींमध्ये ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज, सचिन मोहन चोभे, संदीप जाधव, पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर दानी, अमित गायकवाड, डॉ. नागेश शेळके, प्रिया कोठारी, यांचा समावेश होता.

यांच्यासह सतीश सातपुते, बाळासाहेब खपके, बाळासाहेब कोतकर गुरुजी, रामदास कोतकर, संतोष घोलप हेही सहभागी झाले. या सर्वांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

कार्यक्रमाच्या दरम्यान अनेकांनी अभ्यासपूर्ण विचार मांडत भविष्यातील दिशा स्पष्ट केली. याआधारे लवकरच चिंतन बैठक घेऊन पुढील कृती आराखडा ठरवण्याची तयारी सुरू आहे.

या परिषदेच्या यशस्वीतासाठी संभाजी सोनवणे, सुनील जाजगे, दादासाहेब घोलप, त्रिदल सैनिक संघाचे एकनाथ आडसुरे, सतीश गेरंगे, प्रा. अशोक घोरपडे, मच्छिंद्रनाथ म्हस्के, निशांत नांगरे, ऋतिक लोंढे, महेश इघे आदींनी विशेष मेहनत घेतली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !